Tuesday, June 10, 2008

marathi kavita (मनोगत)

भिजत होतो पावसात मी , ओढ होति रेनकोटची .जवळ छप्पर वाट पाहत होते.थेंब पागोळ्या हो ऊन सांगत होते "भिजणार नहिस तू इथे". पण ओढ होति रेनकोटची.
शर्टानेही मिठी मारली होति मला..............

पण भिजत राहिलो पावसात मी ,निजत राहिलो स्वप्नांत माझ्या. वेळ सरत चालला होता, छप्पराकडे पाहत.
छप्परही भरत होते भिजलेल्या लोकांनी. पण स्वप्न मी रंगवत होतो त्या भिजलेल्या बोटांनी. रंगांची मात्र कमी होति. केनवस हि मळकट होता.काळा रंग त्यातून झळकत होता. तरिही रंगवत राहिलोकारण ओढ होति रेनकोटची.........


आजही भिजत आहे पावसात मी. उसने रंग , छप्परही खलि नाहि.
पण भिजण्यातहि मजा आहे
कारण ओढ आहे रेनकोटची...........

पिंपळपान


पिंपळपान 03-05-2008

तुटले पिंपळपान पुन्हा
वारयावरती झुलणारे
सड्यात सामिल हो.ऊन
सुगंधास तुझ्या भुलणारे

कोवळे पान विसरून भान
तुझ्याच प्रहरी खुलणारे
स्पर्ष न करता तोडून तू
तुझ्यावर ते रुसणारे

वारयासंगती भटकून
तुझ्यापर्यंत पोहोचणारे
चिरडून तू पायांखाली
तिथे न आता रुजणारे

हिरवे पान सुकून गेले
सुकलेले अश्रु पुसणारे
नकळत सोसून सारे
पुन्हा न कधी ते फुलणारे

भेगा पडून गेल्या जरी
समोर तुझ्या न कुजणरे
सुकलेले पिंपळपान हे
आठवणींत त्या मुरणारे

आठवण

आठवण
ते क्षण आता आठवण म्हणुन आठवून येतात,
या थंड वातावरणात आठवणिही गोठून जातात.

आनंदचा खरा आभास दु:खातच जाणवतो,
त्या क्षणांचा आनंद आता या गोठलेल्या आठवणिंतच कळतो.

त्याच आठवणी आता ह्रिदयात दाटून येतात,
मी आलो नाहि तरी त्या मला तुझ्या पर्यंत नेतात.

तुझ्या आनंदात मी नसलो तरी माझ्या आठवणी जरूर असतील,
तुझ्या आनंदाचे गाणे माझ्या आथवणीच गात असतील.

पण हे तुझ्या आनंदचे क्षण आता नाहि आठवणार,
कारण तुझ्या आठवणिंपैकी एक आठवण कमी होणार.

ह्या आनंदात न सामिल व्हायची कधीच राहणार नाहि खंत,
कारण तुझ्या प्रेमळ आठवणिंचा कधीच होणार नाहि अंत

आजवरहि त्याच आथवणी मला खुश करताहेत,
पुन:पुन्हा नव्याने जगण्याचा जोश भरताहेत.

म्हणून या तुझ्या आनंदात मी ही आज आनंदी आहे,
तुझ्या प्रेमाच्या पिटार्यात आजही मी बंद आहे.



पाऊस

पाऊस

वार्यात धारा धारांत पाणि,
का दूर तु माझ्या, जवळ बस ना माझी फ़ुलरणी.

हा पाऊस माझा तुझा ,
धुंद प्रेमात आपल्या ,
मग भिती कसली,
जवळ ही नाहित सावल्या.

डोल्यांत पाहुनी तुझ्या, म्रुग्धारा बरसल्या.
त्या मुसळधार पावसात भिजण्यासठी, माझ्या पापण्याही तरसल्या.

तुझ्या ओल्याचिंब शरीराला पाहुन, मनी जो सुगंध दरवळला .
पाऊस ही त्यामुळे, त्या मातीच्या गंधास विस्मरला.

तुझ्या गारठलेल्या ओठंची लाली पाऊस घेऊन जात होता,
लाल पाण्यात घेऊन आपल्या प्रेमाचे रंग दाखवीत होता

मग का थांबवु मी त्यासि,
जो परतत होता माझ्याकडे देऊन स्पर्श तुझसी.

हातात हात घेऊन ,चल ओलेचिंब हो.ऊ या पावसात .
नाचू त्या पावसाच्या लयात, फ़क्त तुझ्या सहवासात.

मग बिलग तू मला ,ठेऊन तुझे मस्तक माझ्या छातीवर,
ऊचलून तुझ्या टाचा त्या ओल्या ओल्या मातीवर.

मातीच्या त्या चिखलात पाय तुझे भिजतील ,
बनवून टेकु मला शरीर तुझे नीजतील.

मग ऊचलून तुला घेऊन जाईन मी छप्पराखाली ,
घेऊन हात माझा, त्या ओल्या ओल्या केसांखाली.

तू बघीत रहा मला त्या प्रेमळश्या नजरेने,
दुसर्या पावसाची वाट पाहत या मेघांच्या गजराने .

खिन्न मनास

खिन्न मनास
मन आज खूप खिन्न आहे,
दाबून भावना मनात मन खूप सुन्न आहे.

हसून किती रे दखवू तुम्हास मन माझे तेवढेच उदास आहे,
हस्ण्यावर जाऊ नका माझ्या हातर ऊगीच तुमचा भास आहे.

एकटाच मी तुम्हांत जसा तारा तारकांत,
चंद्राच्या वाटेवर जऊन त्या मंद चांदण्यात.

समजावून स्वतःच स्वतःला क्षण साठवतो आहे मी,
त्रासलेल्या मनास सावरण्याकरता कुणी आहे का हे आठवतो आहे मी.

ह्रिदयास बांध किती स्पंदनात गुंतलेले,
गुliयास सोडविताना गाठीच बसतील रे.

मन मोकळे करण्यास टेकूच नाहि आता,
दूर आहे तुम्हापासून जवळ कुणीच नाहि आता.

वाट पाहत पाहत मन भटकतय शून्यात,
नजरा हि स्थीर डोल्यांतले अश्रू थांबवून.

कुणास सांगू माझ्या मनाची व्यथा ,
बनून रहील ती तुमच्याकरता फ़क्त एक कथा.

खूप दूर गेल्यासारखे वाटते तुम्हापासून मला,
पाठीसोडून गेलात तुमच्या या निरागस बाळाला.

मन आज खूप खिन्न आहे ,
पण .......त्याल मीच जिवाशी कवटाळले आहे .